Wednesday, 10 June 2009

इतिहासातील गूढ

इतिहास बदलतो की तसाच राहतो? इतिहास कोण लिहितं आणि कोण बदलतं? प्रश्न गूढ आहेत. ते पुन: पुन्हा विचारले जातात आणि वादाला तोंड फोडतात. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा उल्लेख गाळून ते उत्तम प्रशासक होते, असा बदल इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात यावषीर् केला गेल्यानंतर अशाच एका वादाला तोंड फुटलंय आणि काही जातीय संघटनांच्या दबावाला सरकार बळी पडल्याचा आरोप करीत काही राजकीय पक्षांनी वातावरण तापवलंय. वस्तुस्थिती काय आहे?
गेल्या वषीर् पुण्याच्या सचिन गोडांबे या कम्प्युटर इंजिनीयर तरुणाने माहितीच्या अधिकाराखाली सरकारकडे एक पत्र पाठवून विचारणा केली होती की, शालेय पाठ्यपुस्तकातील धड्यात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, असं जे लिहिलेलं आहे त्याला कोणता ऐतिहासिक आधार आहे? त्यावर शिक्षण मंडळाने असं कळवलं होतं की, हा उल्लेख ३७ वर्षांपूवीर्चा असून त्यावेळी कोणता पुरावा लेखकाने वापरला होता याची कल्पना नाही व आता तसा पुरावा देता येत नाही. त्यावर गोडांबेंनी कळवलं की, सरकारकडे पुरावा नसेल तर हा उल्लेख काढून टाकावा. मग सरकारने याबाबतची ऐतिहासिक सत्यता पडताळून पाहण्यासाठी इतिहास संशोधक आणि अभ्यासकांची एक समिती नेमली. या समितीने दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असा निर्वाळा दिला. प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार हे या समितीचे एक सदस्य होते.
डॉ. पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे, ''परमानंदकृत 'शिवभारत' या शिवचरित्राच्या रूपाने अत्यंत विश्वसनीय पुरावा उपलब्ध आहे. आणि तो नव्याने वगैरे सापडलेला नाही, तो जुनाच आहे. परमानंद हे शहाजी राजांच्या पदरी होते. ते पुणेप्रांती आल्यावर शिवाजी महाराजांनी त्यांना स्वत:चं चरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ती शिरसावंद्य मानून परमानंदांनी शिवरायांच्या बरोबर राहून त्यांचं चरित्र लिहिलं. शिवबांना वयाच्या बाराव्या वषीर् जिजामातेसह शहाजी राजांनी बेंगळुरूहून पुणेप्रांती पाठवलं तेव्हा त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, मुबलक खजिना अशा गोष्टींबरोबरच काही निष्णात अध्यापकही पाठवल्याचा उल्लेख या 'शिवभारता'त आहे, पण त्यात कुठेही दादोजी कोंडदेवांचं नाव नाही. संपूर्ण 'शिवभारता'त दादोजींचं नाव नाही. १६३० ते १६४७ या शिवरायांच्या जडणघडणीच्या काळात दादोजी कोंडदेवांचा उल्लेख कुठेही सापडत नाही. 'सभासदाची बखर' ही शिवकालीन एकमेव बखर. तिच्यातही दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून उल्लेख नाही. ज्या बखरींमध्ये असे उल्लेख आहेत त्या शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर पुढच्या दीडशे वर्षांत लिहिल्या गेल्या आहेत. एवढंच नव्हे तर शिवकाळातली आदिलशहाची जी फर्मानं आहेत त्यात दादोजी कोंडदेवांचा उल्लेख 'मुतालिक' (कारभारी) असाच आहे.''
'शिवभारत'च्या उपलब्ध दोन प्रतींपैकी स. मा. जोशी यांनी तयार केलेली प्रत १९२७ सालीच प्रसिद्ध झाली होती. म्हणजे हा पुरावा ८० वर्षांपूवीर्च उपलब्ध होता. पण तो दुर्लक्षित करून ३७ वर्षांपूवीर्, दादोजी कोंडदेवांचा शिवरायांचे गुरू म्हणून उल्लेख पाठ्यपुस्तकात करण्यात आला, तेव्हा त्यालाही काही पुरावा असू शकेल. भावनांचं राजकारण करणारे राजकारणी आणि आंदोलक यांनी हा वाद नाहक चिघळवण्यापेक्षा, तो पुरावा गोळा करणंच अधिक शहाणपणाचं ठरणार नाही काय? इतिहासाचं गूढ पुराव्यांनी उकलायचं असतं, अस्मिता आणि भावनांनी नव्हे

Friday, 5 June 2009

बाल भारतीने केली चुक मान्य

इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून असलेला दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख नव्या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर जुन्या पुस्तकातील दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करतानाचे छायाचित्रही 'बालभारती'ने वगळले आहे.
दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा 'ऐतिहासिक' निष्कर्ष क्रीडामंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काढला होता. ह्या निर्णयाला विरोध करीत गजानन मेहेंदळे , निनाद बेडेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन 'दादोजो कोंडदेव कुलकर्णी' हे शिवरायांचे गुरू होते असे म्हटले होते आणि ह्याला पाठ्य पुस्तकातील पुराव्याचा आधार दिला होता. त्याला उत्तर देताना डॉ. जयसिंगराव पवार , डॉ. वसंतराव मोरे यांनी आवाहन दिले होते की बेडेकर , मेहेंदळे आदी मंडळींनी समकालीन पुरावा सादर करावा, त्यावेळेस बेडेकर ,मेहेंदळे यांच्याकडून एकही पुरावा सादर केला गेला नाही.
आता प्रश्न असा उरतो की जर एकही पुरावा नसेल तर काही इतिहासकारांनी, शाहिरांनी असा खोटा इतिहास का मांडला? बर जर चुक झाली तर हे लोक का स्वीकारत नाहीत की एकही समकालीन पुरावा नाही म्हणून?
ह्या लढ्यासाठी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. वसंतराव पवार आणि सर्व संघटना ज्यांनी ज्यांनी हा खरा इतिहास समोर आणला त्या सर्वांचे आभार आणि शिवरायांना माफी मागतो की आपला खरा इतिहास लोकांसमोर आणण्यास आम्हाला उशीर झाला.
इतिहासातील अनेक साहित्यांत दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे पुरावे सापडत नाहीत. शहाजी महाराज आणि जिजामाता यांनीच शिवाजीराजांना सर्व प्रशिक्षण दिले आहे. किंबहुना, शिवाजी महाराजांची खरी प्रेरणा म्हणजे शहाजी महाराज आणि जिजाबाईच आहेत. काही इतिहासकारांनी आजवर अतिशय खोटा आणि अप्रस्तुत असा इतिहास लोकांसमोर मांडला होता; पण वस्तुस्थिती तशी नाही. दादोजी हे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी होते; पण ते शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा उल्लेख कुठेही सापडत नाही. दादोजी कोंडदेव यांच्या नावाचा पुरस्कार बंद झाला. आता इतिहासाच्या पुस्तकातूनही त्यांचे नाव वगळले गेले असल्याने, लाल महालात असणारे त्यांचे शिल्पही महापालिकेने काढून टाकावे, अशी आमची मागणी आहे.







Saturday, 30 May 2009

शिवस्मारक आदर्शवत व्हावे - संभाजी ब्रिगेड

कोल्हापूर - बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील शिवस्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे, अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी समितीचा मीच अध्यक्ष असल्याचा खुलासा काल केल्याने या वादावर पडदा पडला आहे. श्री. पाटील, डॉ. चव्हाण म्हणाले, ""समितीच्या सदस्यपदावरून बाबासाहेब पुरंदरे यांना दूर करावे. त्याचबरोबर मराठी माणसांसाठी काम करण्यापेक्षा भांडणे लावणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथम आपली मुले मराठी माध्यमाच्या शाळेत घालावीत.'' डॉ. चव्हाण म्हणाले, "जगाला आदर्श ठरेल असे शिवस्मारक मुंबईत व्हावे, ही मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. स्मारकाचा वाद हा पुरोगामी व प्रतिगामी शक्तींमधील आहे. श्री. पुरंदरे यांनी कोणत्याही संशोधनाशिवाय, संदर्भाशिवाय शिवाजी महाराजांविषयी लिहिलेली पुस्तके सुमार दर्जाची व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची अवहेलना करणारी आहेत. त्यांनी 2003 मध्ये लिहिलेल्या "राजा शिवछत्रपती' पुस्तकातील लिखाण वाचल्यानंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाचे मूळ कोठे आहे, हे समजून येते.''
ते म्हणाले, "श्री. पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखालील पुण्यातील लालमहाल, डेरवण (जि. रत्नागिरी) व सोलापूर येथे उभारलेली शिवसृष्टी वादाच्या भोवऱ्यात आहे. युती शासनाच्या काळात त्यांना पुणे जिल्ह्यातील दिलेल्या 25 एकर जमिनीवर काहीही झालेले नाही. आमचा वाद हा श्री. पुरंदरे किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल नाही, तर वर्षानुवर्षे चाललेल्या सांस्कृतिक दहशतवादाबाबत आहे. म्हणून बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील स्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे.''

समितीत पुरंदरे नकोत


राज यांच्या टिकेला प्रत्युत्तर