Saturday 30 May 2009

शिवस्मारक आदर्शवत व्हावे - संभाजी ब्रिगेड

कोल्हापूर - बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील शिवस्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे, अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी समितीचा मीच अध्यक्ष असल्याचा खुलासा काल केल्याने या वादावर पडदा पडला आहे. श्री. पाटील, डॉ. चव्हाण म्हणाले, ""समितीच्या सदस्यपदावरून बाबासाहेब पुरंदरे यांना दूर करावे. त्याचबरोबर मराठी माणसांसाठी काम करण्यापेक्षा भांडणे लावणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथम आपली मुले मराठी माध्यमाच्या शाळेत घालावीत.'' डॉ. चव्हाण म्हणाले, "जगाला आदर्श ठरेल असे शिवस्मारक मुंबईत व्हावे, ही मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. स्मारकाचा वाद हा पुरोगामी व प्रतिगामी शक्तींमधील आहे. श्री. पुरंदरे यांनी कोणत्याही संशोधनाशिवाय, संदर्भाशिवाय शिवाजी महाराजांविषयी लिहिलेली पुस्तके सुमार दर्जाची व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची अवहेलना करणारी आहेत. त्यांनी 2003 मध्ये लिहिलेल्या "राजा शिवछत्रपती' पुस्तकातील लिखाण वाचल्यानंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाचे मूळ कोठे आहे, हे समजून येते.''
ते म्हणाले, "श्री. पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखालील पुण्यातील लालमहाल, डेरवण (जि. रत्नागिरी) व सोलापूर येथे उभारलेली शिवसृष्टी वादाच्या भोवऱ्यात आहे. युती शासनाच्या काळात त्यांना पुणे जिल्ह्यातील दिलेल्या 25 एकर जमिनीवर काहीही झालेले नाही. आमचा वाद हा श्री. पुरंदरे किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल नाही, तर वर्षानुवर्षे चाललेल्या सांस्कृतिक दहशतवादाबाबत आहे. म्हणून बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील स्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे.''

1 comment:

Kavita Sagar Diwali Ank 2013 said...

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ. सुनील पाटील

जयसिंगपूर - जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जयसिंगपूर येथील प्रतिथयश साहित्यिक संस्था कवितासागरचे कार्यकारी संचालक, साहित्यिक, संपादक व प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. सुनील पाटील यांना जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र जे. बी. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले असून सदर नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी राहील अशी माहिती प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी दिली.

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेची विभागीय कार्यकारिणीची बैठक कोल्हापूर येथील संभाजीनगरमध्ये झाली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील, समन्वयक गिरीश लक्ष्मण जाधव, विभागीय सचिव राजेंद्र बळवंत यादव यांच्यासह जिल्हा सचिव प्रमोद सुभाष पाटील व अन्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी एकमताने डॉ. सुनील पाटील यांची निवड करण्यात आली.

शिरोळ तालुक्यातील साहित्यिकाला प्रथमच कार्याध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विकासासाठी प्रयत्न करणे, मराठी भाषा व साहित्य यांच्या अभ्यासास उत्तेजन देणे, मराठी वाचकांची वाड्‌.मयीन अभिरुची वृध्दिंगत करणे आणि मराठी साहित्यिकांच्या हितासाठी व कल्याणासाठी झटणे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उद्दिष्ट ठेवून व्यापक कार्य करण्यासाठी डॉ. सुनील पाटील कार्यरत आहेत.

जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेद्वारे उपेक्षित साहित्य आणि वंचित साहित्यिकांना वाव देण्याचे कार्य केले जाते. मराठा -बहुजन समाजातील नवोदित साहित्यिकांना स्वतंत्र विचारपीठ देणाऱ्या परिषदेकडून अखिल भारतीय पातळीवर साहित्य परिषदेची अनेक साहित्य झाली असून, पुढील साहित्य संमेलने महाराष्ट्राबाहेर तर भविष्यातील काही संमेलने देशाबाहेर भरविण्याचा प्रयत्न आहे. गावपातळीवर साहित्य परिषदेचे विचार, कार्य पोचावे हा साहित्य परिषदेचा हेतू असून, मराठा-बहुजन समाजाला साहित्याकडे वळविणे आणि साहित्यिक तयार करणे व त्यासाठी देश, विभाग, जिल्हा, तालुका, गावपातळीवर कार्यशाळा संमेलने घेण्याचे परिषदेच्या कार्याचे स्वरूप आहे, असे डॉ. सुनील पाटील यांनी स्पष्ट केले. या निवडीबद्दल डॉ. सुनील पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



छायाचित्र:

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र डॉ. सुनील पाटील यांना देतांना राजेंद्र यादव, जे. बी. शिंदे, डॉ. निर्मला पाटील आदी.