Sunday 28 December 2008

४ जानेवारी पासून मराठा आरक्षण जागृती यात्रा


बापटांनी मराठ्यांवर अन्याय केला- मेटे


मराठा समाजावर बापट आयोगाने अन्याय केला असून या अहवालाचा निषेध तसेच होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने हा अहवाल त्वरित सराफ आयोगाकडे पाठवावा आणि आगामी निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, असे ठराव मराठा समन्वय समितीच्या मंजूर करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.


डॉ. नितू मांडके हाऊस येथे रविवारी समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची मेटे यांनी माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी चार जानेवारीला रायगडापासून आरक्षण जागृती यात्रा काढण्यात येणार असून त्याचा समारोप एक फेबुवारीला शिवाजी पार्क येथे होणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. बैठकीत समितीची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

Monday 15 December 2008

Karkare wept over Malegaon charges


Minutes before he fell to the terrorists' bullets on November 26, Maharashtra ATS chief Hemant Karkare had wept before the then Deputy Chief Minister R R Patil, narrating the agony of being targeted over handling of the Malegaon blast probe. This was revealed by Patil, who was also in-charge of the police department, to newspersons gathered in Nagpur for the winter session of Maharashtra legislature on Monday.


"On November 26, Karkare came with the entire ATS team to meet me at around 2030 hrs. He was with me till 2130 hrs. With tears rolling down his eyes, Karkare told me about the allegations being levelled against him (in Malegaon blasts case)," Patil said. "Soon after Karkare left, came the news of his being killed. Maybe that was destiny," Patil said. Among prominent critics of Karkare were the Shiv Sena which riled the senior police official through its mouthpiece Saamana, alleging that ATS was working under political pressure while probing the blast in which some radical Hindu outfits had come under scanner.

Tuesday 25 November 2008

संभाजी ब्रिगेडचे नांदेडला पाचवे राष्ट्रीय अधिवेशन - वैभव तळेकर

लातूर, ता. २५ - संभाजी ब्रिगेडचे पाचवे राष्ट्रीय महाअधिवेशन ३०नोव्हेंबरला नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव तळेकर यांनी दिली. या अधिवेशनाचे उद्‌घाटन कोल्हापूर संस्थानचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनंत चौंदे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष नांदेडचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे हे आहेत. या अधिवेशनाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात संघटनचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांचे "संभाजी ब्रिगेड ः मराठा अस्मितेचा लोकलढा' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी मनोज आखरे हे असून प्रमुख पाहुणे म्हणून बाबाराव शृंगारे, गुणवंत आठरे, हेमंत गौरकर उपस्थित राहणार आहेत.
इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे "सामाजिक, सांस्कृतिक दहशतवाद आणि आजचा युवक' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रवीण गायकवाड राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष गाजरे, सोमनाथ नवले, मनोज वाघ, विकास पासलकर उपस्थित राहणार आहेत. शिवराज महाराज पंढरपूरकर यांचे ""तुकोबांचे "वार'करी ः संभाजी ब्रिगेड' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रदीप साळुंके राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. बालाजी वाघमारे, रणजित कारेगावकर, राजेंद्र आढाव, माधव पावडे उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व सुरेश हावरे यांचा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चौंदे राहणार आहेत. तरी या अधिवेशनाला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. तळेकर, कार्याध्यक्ष गोविंद सिरसाठ, ऍड. धनंजय भिसे, आकाश भोसले, महेश अलगुडे, शाहूराज पाटील, किरण बिडवे, बाळासाहेब जाधव , गोविंद पाटील यांनी केले आहे.

Thursday 20 November 2008

ए. टी. एस. ने लावला मोका

मुंबई, ता. २० - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोका) कारवाई करण्यात आल्याची माहिती या पथकाचे सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे यांनी दिली. अतिशय संवेदनशील असलेल्या या प्रकरणाचा तपास करताना एटीएसवर कसल्याही प्रकारचा राजकीय दबाव नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मालेगाव येथे २९ सप्टेंबरला मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचे बळी गेले, तर ८० जण जखमी झाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, दयानंद पांडे ऊर्फ स्वामी अमृतानंद देव, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, श्‍यामलाल साहू, शिवनारायण कालसांगरा, अजय राहिरकर, राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे या दहा जणांना अटक केली. "अभिनव भारत' आणि "जय वंदेमातरम्‌' संघटनांशी संबंधित असलेल्या या आरोपींवर सुरुवातीला भारतीय दंड विधान कलमाखालील कायद्यांखाली कारवाई करण्यात आली होती. अटक आरोपींतील काहींचा यापूर्वीच्या गुन्ह्यांत सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर आज महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्या (मोका) खाली कारवाई करण्यात आली. मोका कायद्यातील कलम-३ च्या उपकलम सी-१,२ व ४ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणाची सुनावणी नाशिक न्यायालयात सुरू आहे. मोका कारवाईनंतर ही सुनावणी मुंबईतील "मोका' न्यायालयात होणार आहे. माटुंगा पोलिसांनी अटक केलेल्या सुधाकर चतुर्वेदी या आरोपीची एटीएसने आज सायंकाळी कस्टडी घेतली असून, याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या अकरा होणार असल्याचेही करकरे या वेळी म्हणाले. या प्रकरणातील आरोपींच्या कारवाया देशातील विविध राज्यांत सुरू होत्या. त्यांच्याशी संबंधित काही साक्षीदारांचे जबाबही एटीएसने लिहून घेतले आहेत. या आरोपींना होणाऱ्या अर्थपुरवठ्याचादेखील तपास सुरू आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव अथवा दडपण आपल्यावर नाही. संपूर्ण तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. तपासावर आक्षेप घेत कोणी जनहित याचिका दाखल केल्या असतील, तर आपल्याला त्याची माहिती नाही. याप्रकरणी आपण न्यायालयाला उत्तरदायित्व असल्याचेही करकरे यांनी या वेळी सांगितले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीच्या चौकशीत "समझोता एक्‍स्प्रेस'मधील बॉम्बस्फोटाचा उल्लेख झाला होता. मात्र या प्रकरणाची खातरजमा सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी यापूर्वीच सांगितले आहे. एटीएसने सध्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावर लक्ष्य केंद्रित केले असून, अन्य स्फोटांबाबतची माहिती आवश्‍यकतेनुसार तपासयंत्रणांना दिली जाईल, असेही ते म्हणाले. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला कोठडीत होत असलेल्या मारहाणीचा आरोप खोटा आहे. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य आरोपींच्या झालेल्या नार्को चाचणीचा अहवाल अद्याप पोलिसांकडे आला नसल्याचेही करकरे या वेळी म्हणाले. स्फोटाच्या तपासासंबंधी प्रसिद्धिमाध्यमांत येणाऱ्या बातम्या अनेकदा अटकळींवर आधारित असतात. या प्रकरणातील विविध पैलू तपास पूर्ण होण्याआधी प्रसिद्धीमाध्यमांसमोर उघडकीस आणल्यास ते तपासाला घातक ठरण्याची शक्‍यताही करकरे यांनी या वेळी वर्तविली.
-----------------------------------------------------
लेफ्टनंट पुरोहितच "अभिनव भारत'चा संस्थापक मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसने अटक केलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यानेच फेब्रुवारी २००६ मध्ये "अभिनव भारत' संघटनेची स्थापना केल्याची माहिती एटीएसचे सह आयुक्त करकरे यांनी या वेळी दिली. मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपींना पुरोहित याने मिथून चक्रवर्ती नावाने प्रशिक्षण दिल्याची बाब तपासाधिन असल्याचेही करकरे यांनी या वेळी सांगितले.
-----------------------------------------------------
राकेश धावडेवरील गुन्हे "मोक्का'साठी ठरले अनुकूल मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेला आरोपी राकेश धावडे याचा परभणी व जालना येथील स्फोटात सहभाग सिद्ध झाला आहे. त्याच्याविरुद्ध परभणीच्या पूर्णा येथील मेहराजूल उलुम मदरशाजवळ बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी ननलपेठ पोलिस ठाणे; तर जुना जालनाच्या मालीपुरा येथील जामा मशिदीजवळ स्फोट घडविल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मालेगाव स्फोटातील काही आरोपींवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असले, तरी राकेश धावडेवर दाखल असलेले गुन्हे मालेगाव स्फोटातील आरोपींना मोक्का लावण्याला महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जाते.
-------------------------------------------------------------
"रामजी'चा शोध सुरू मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी "रामजी' या आरोपीचा शोध सुरू आहे. तो या स्फोटातील महत्त्वपूर्ण आरोपी असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात "भगवान' नावाच्या आणखी एका व्यक्तीचे नाव पुढे येत असले, तरी या नावाचा व्यक्ती अस्तित्वात आहे अथवा नाही याचाही शोध सुरू असल्याचे हा अधिकारी म्हणाला. -------------------------------------------------------------

Sunday 2 November 2008

विश्वशांती किती खरी किती खोटी?

कोल्हापूर शहराचे नाव आठवतच राजश्री शाहू महाराजांची आठवण होते. ह्याच कोल्हापूर शहरात विश्वशांती यज्ञ आयोजित केला आहे. यज्ञ समितीच्या मते या यज्ञमुळे समाजात शांतता प्रस्थापित होईल, पुर्वी पासून यज्ञ होत आले आहेत आणि कोल्हापुरातच तीनशे वर्षा पुर्वी चाण्डी महायज्ञ झाल्याचा दाखलही यज्ञ समितीचे प्रमुख राम कुंडलाजी महाराज यांनी दिला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की या महायज्ञतून अंध श्रद्धा पसरवण्याचे काम होत आहे हे सिद्ध करावे मग मी सण्यासी व्रतचा त्याग करेन. जर ह्या यज्ञ तून खरोखरीच विश्वशांती प्रस्थापित होणार आसेल तर जे ह्या यज्ञला विरोध करतात त्या संघटनाना विश्व शांती नको आहे. यज्ञ समितीच्या मते यज्ञमुळे कोल्हापुरला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळणार आहे. कोल्हापुरला राजश्री शाहू महाराजांमुळे प्रेरणा क्षेत्राचा दर्जा हा मिळाला आहे आणि तोच प्रेरणा क्षेत्राचा दर्जा राहू द्यावा. कोल्हापुरात पर्यटक गेल्यास अगोदर तो राजश्री शाहू महाराजांच्या राजवाड्यात गेल्या शिवाय राहत नाही. शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचीच प्रेरणा घेण्याची खरी गरज आहे.
आता ज्या साठी यज्ञ समितीने विश्वशांती यज्ञ आयोजित केला आहे त्याचे कारण विश्व शांती प्रस्थापित करणे हे दिले आहे. आज भारतिया समोर दहशत वाद, शेतकर्यांची आत्म् हत्या, बेरोजगारी, अन्न- धण्या चा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, बहुजन समाजाला शिक्षणाचा प्रश्न , असे बरेच प्रश्न त्यांच्या समोर आहेत. जर ह्यातील एक जरी प्रश्न महा यज्ञ ळे सुटणार आसेल तर तर जरूर हा यज्ञ हो द्यावा आणि ज्या संघटना विरोध करत आहेत त्यांनी पण यज्ञ व्यवस्थित होण्या साठी मदत करावी. कीबहुना ह्या साठी आर्थिक मदत पण करावी. आता महत्वाचे असे की ह्या यज्ञ मुळे खरच विश्वशांती प्रस्थापित होणार आहे का? आजचे युग हे विज्ञानचे युग आहे. मग हा यज्ञ विज्ञानाला आनुसरून आहे का? आणि विज्ञानाच्या कुठल्या थेरि मध्ये मोडत आहे? तर ह्याला एकाच उत्तर की हा यज्ञ आयोजित केलाआहे तो विज्ञानाच्या कुठल्याही चौकटीत बसत नाही. म्हणजे हा यज्ञ फ़क्त सामन्या जनतेची, त्या मध्ये बहुजन समाजाची दिशाभूल करण्या साठी आयोजित केला आहे हा निष्कर्ष निघतो. ह्या यज्ञ मध्ये लाखो रुपयाचे तूप आणि ईतर साहित्य भस्मसात होणार आहे. आजची वाढती महागायि आणि त्यात असा यज्ञ आयोजित करणे म्हणजे जे भुकेलेले, ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही त्या लोकांची टिंगल करण्या सारखे होय. आज जनतेला अशा यज्ञ ची गरज नसून आज पर्यंत जे जे थोर नेते हो उंन गेले त्या सर्व महा मानवाच्या प्रेरणाची गरज आहे. शाहू - फुले - आंबेडकर यांनी कधी अश्या यज्ञ ची मदत घेतलेली आठवते का? उलट शिवाजी महाराजा विरुद्ध मुघल सरदार जिंकवा म्हणून पुण्यातील काही ब्राह्मणानि कोटी चाण्डी यज्ञ आयोजित केला होता तरीही शिवाजी महाराजांना अपयश आले का? मुळीच नाही . शिवाजी महाराजा सारखा राजा आपल्या मातीत होउन गेला या सारखे दुसरे भाग्य तरी आहे का? त्यांच्या प्रत्येक कार्यात जी प्रेरणाची उर्जा आहे त्याची खरी गरज आहे.
कधी महाराज लढाई सोडून कर्म कांड करीत होते का? त्यांची श्राध्ा जरूर होती पण ती अशी अंध श्रद्धा कधीच नव्हती. आणि आज यज्ञ आयोजित करून ह्याच अंध श्रद्धेला खात पाणी घातले जात आहे हे निदर्शन होते. यज्ञ समितीचे प्रमुख राम कुंडलाजी महाराज यांनी यज्ञ ला विरोध करणार्‍यांशी चर्चा करण्याची तयारी दाखविली आहे. तर चर्चा जरूर होयला पाहिजे. कारण कुठलाही राडा न होता चर्चेने प्रश्न सोडवणे आणि सार्वजनिक माल मत्तेचे नुकसान ना होऊ देणे हेच सामन्या माणसाला जे यज्ञला विरोध करतात आणि जे यज्ञला पाठिंबा देतात त्याच्या कडून आपेक्षित आहे.

शिवश्री उस्मानाबाद

Thursday 30 October 2008

महायज्ञविरोधात रविवारी 'कोल्हापूर बंद'चे आवाहन-म. टा.

महायज्ञ केल्यामुळे विश्वशांती होते, हे निव्वळ थोतांड असून, सोमवारपासून सुरू होणारा 'माँ वरदायिनी यज्ञ समिती'चा महायज्ञ कोल्हापूरच्या शाहूप्रेमी जनतेने उधळून लावावा, असे आवाहन लोकआंदोलन समितीने केले आहे.
गांधी मैदानावर सोमवारपासून तब्बल दहा दिवस महायज्ञ सुरू राहणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना यज्ञाचा हा घाट हाणून पाडण्यासाठी दहा दिवस गांधी मैदानावर मोर्चा काढून निदर्शने करण्याचा कार्यक्रम लोकआंदोलन समितीने गुरुवारी बिंदू चौकात जाहीर केला. महायज्ञविरोधात २७ लहान मोठ्या संघटना सहभागी झाल्या आहेत. ' छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर जनतेने या महायज्ञाला विरोध करावा, असा आग्रह धरला. या महायज्ञाच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनात युवराज संभाजी व मालोजी सक्रीय सहभागी होणार असल्याचे सभेचे अध्यक्ष अॅड. गोविंद पानसरे यांनी जाहीर केले. '
महायज्ञाच्या संयोजकांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. त्यांचा बंदोबस्त सरकारने केला पाहिजे, अशी मागणी करत खा. सदाशिवराव मंडलिक यांनी यज्ञात आहुती म्हणून टाकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचे वाटप भुकेल्यांना करण्याचे आवाहन केले. रविवारच्या 'कोल्हापूर बंद'ला दुकानदार व उद्योजकांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन पानसरे यांनी यावेळी केले.
' भारताला असलेले धामिर्क स्वातंत्र्य धर्माचा बाजार मांडण्यासाठी नाही. महायज्ञासारख्या कर्मकांडाचा आधार घेऊन समाजात फूट पाडणाऱ्या भोंदूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सरकारची आहे. महायज्ञामुळे विश्वशांती होते, हे निव्वळ ढोंग असून, अशा अफवा पसरवण्यांवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी प्रा. एन. डी. पाटील यांनी केली. इतिहासाचे गाढे अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी 'महाराष्ट्र इतिहास परिषदे'तफेर् महायज्ञाला विरोध केला. परभणीत काही वर्षांपूवीर् असाच महायज्ञ केला गेला. परंतु त्यातून विश्वशांती होऊ शकली नाही, ही आठवण त्यांनी करून दिली.

वामन प्रतिमेचे दहन, यज्ञ रोखण्यासाठी उठाव करा- दैनिक लोकमत




Wednesday 29 October 2008

भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रेनिंग घेतल्याचं उघड

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंगला अटक करण्यात आल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांचा स्फोटांशी संबंध असल्याबाबत एटीएसनं तपास सुरू केला आहे. दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 2001 मध्ये नागपूरच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ट्रेनिंग घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिलिटरी स्कूलचे संचालक सतीश सालफेकर यांनी याबाबत माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी एटीएसनं त्यांच्याकडे चौकशी करत बजरंग दलाच्या प्रशिक्षण शिबिरांची माहिती घेतली होती. मात्र त्यानंतर एटीएसनं आमच्याशी काहीही संपर्क साधला नाही, असं स्पष्टीकरणही साल्फेकर यांनी दिलं.
नागपूरची भोसला मिलिटरी स्कूल ही नाशिकच्याच भोसला मिलीटरीची शाखा आहे. नांदेडमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर एटीएसनं हिंदुत्ववादी संघटनांवर बारीक नजर ठेवणं सुरू केल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.

मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांसदर्भात हिंदुत्ववादी संघटनांना मदत करणार्‍या दोन निवृत्त लष्करी अधिकार्‍यांसह, एक मेजर आणि एका कॅप्टनला उद्या नाशिकच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. समीर कुळकर्णी आणि रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय अशी त्या अधिकार्‍यांची नावे आहेत. यासंदर्भात 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाईल, असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

दरम्यान भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झालेल्या बजरंग दलाच्या बहुचर्चित शिबिरामध्ये प्रशिक्षक म्हणून कॅ. शरदकुमार भाटे उपस्थित होते. त्यांनीएटीएस ला दिलेल्या माहितीची प्रत आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी निरंजन टकले यांनी मिळवली. त्यात दिलेल्या माहितीनुसार हे 40 दिवसांचे शिबिर होते. या शिबिरासाठी आरएसएसनं दिल्ली, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि दिल्ली इथल्या 115 जणांना आमंत्रीत केलं होतं. या शिबिरासाठी दोन रिटायर्ड आर्मी ऑफिसर आणि एक इंटेलिजंट एजन्सीचा रिटायर्ड ऑफिसर उपस्थित होता. मात्र या शिबिरामध्ये मुलांना अयोग्य गोष्टींचं प्रशिक्षणदेण्यात येत असल्याचं लक्षात आल्यानं आपण हे शिबिर कालावधीआधीच सोडून आल्याचं कॅ. शरदकुमार भाटे यांनी स्पष्ट केलं.

Sunday 12 October 2008

दैनिक लोकमत, दि. १२/१०/२००८




दैनिक लोकमत, दि. १३/१०/२००८


दादोजी शिवरायांचे गुरू नव्हतेच!- मटा, दि. १३/१०/२००८

डॉ. जयसिंग पवार यांचा पुनरुच्चार
दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराजांच्या नात्याबाबत वितंडवाद सुरू असतानाच, दादोजी हे महाराजांचे गुरू, शिक्षक किंवा मार्गदर्शक यांपैकी काहीही नव्हते', असा दावा महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे सवेर्सर्वा डॉ. जयसिंगराव पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात नियुक्त केलेल्या सत्यशोधन सिमितीचे पवार हे सदस्य होते. दादोजी महाराजांचे गुरू होते, असे म्हणणाऱ्यांवर त्यांनी यावेळी खरपूस टीका केली.
'रानडेंपासून शेजवळकरांपर्यंतच्या इतिहासात कोेंडदेव गुरू होते, असा उल्लेख कुठेही नाही.
जेम्स लेनच्या विकृत वक्तव्यातून हा वाद उद्भवला. त्यानिमित्तानेच वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा आपला प्रयत्न आहे', असे ते म्हणाले. ' खऱ्या-खोट्याची शहानिशा करण्यासाठी गेले दोन महिने आपण ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यानंतर दादोजी शिवाजी राजांचे गुरू नव्हते, या निष्कर्षाप्रत आलो. दादोजी हे केवळ प्रशासक होते. त्यांच्यापासून महाराजांनी प्रेरणा घेतली, असे कुठेही नमूद केलेले नाही', असे त्यांनी स्पष्ट केले. 'इतिहास कायम नसतो, जसे संशोधन होते, पुरावे मिळतात, तसा तो बदलत जातो', असेही ते म्हणाले. इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. वसंत मोरे यांनीही त्यांचे समर्थन केले.

Saturday 11 October 2008

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते - डॉ. जयसिंगराव पवार, दैनिक सकाळ

कोल्हापूर, ता. ११ - दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते, असा खुलासा महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संचालक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक नव्हते, असे डॉ. वसंतराव मोरे यांनीही यावेळी स्पष्ट केले.
शिवरायांचे गुरू कोण, हा विषय काही दिवसांपासून गाजतो आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा क्रीडा पुरस्कार तहकूब केला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर खुलासा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक, गुरू किंवा पालक अशा प्रकारची प्रतिमा समाजात रूढ झाली आहे. महाराजांवर लिहिलेल्या बखरी आणि त्या आधारे लिहिलेले इतिहास ग्रंथ कारणीभूत आहेत. सभासद बखर सोडल्यास अन्य सर्व बखरी पेशवेकालीन आहेत. काही बखरी महाराजांच्या निधनानंतर शे-सव्वाशे, तर काही पावणेदोनशे वर्षांनी लिहिल्या आहेत. त्यांचे लिखाण ऐकीव कथांवर आधारित असते. शिवकालीन सभासद बखरीत दादोजी हे शिवरायांचे शिक्षक किंवा गुरू होते, असा निर्देश नाही. इतिहास संशोधनात समकालीन कागदपत्रांना खरे महत्त्व असते.
दादोजींचा शहाजीराजेंशी १६३३ पासून १६४७ या काळात संबंध आला. त्या काळातील उपलब्ध कागदपत्रे (आदिलशाही फर्मानात) दादोजींचा उल्लेख सुभेदार म्हणून, तसेच शहाजीराजांच्या जहागिरीचा मुतालिक (कारभारी) म्हणून आला आहे.'' ते म्हणाले, ""इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, निनाद बेडेकर व गजानन मेहेंदळे यांनी पुरावे असल्याचा दावा केला आहे; पण ते सादर केले नाहीत, कारण त्यांच्याकडे एकही समकालीन पुरावा नाही. समकालीन असलेल्या कवी परमानंदांचे शिवभारत, जेधे करिना, आदिलशाही फर्माने, महजरासारख्या कागदपत्रांत दादोजींचा उल्लेख शिवरायांचे गुरू म्हणून आलेला नाही.'' मेहेंदळे चिकित्सक अभ्यासक आहेत. त्यांच्या शिवचरित्रात दादोजींचा उल्लेख गुरू म्हणून कोठेही आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुरेश शिपूरकर, डॉ. विजयराव शिंदे, शामराव खाडे, सौ. वसुधा पवार, मंजुश्री पवार आदी उपस्थित होते.

धम्म बुद्धांचा आणि बाबांचा


Saturday 4 October 2008

मराठा समाजाला आरक्षण का हवे? -मटा दि. ०५/१०/२००८

- प्रवीण गायकवाड (कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड)

भारतीयांवर मनुवादी विचाराने व मनुस्मृतीच्या कायद्याने मोठा अन्याय केले आहे. मनुस्मृतीमुळे देशातला बहुसंख्य असलेला बहुजन समाज हक्क अधिकारापासून वंचित राहिला. ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य व शूद असे चार वर्ण परंतु कलियुगामध्ये ब्राह्माण व शूद हे दोनच वर्ण, यातील ब्राह्माण संपूर्ण अधिकार संपन्न व शूद हे अधिकार वंचित शूदांना सप्तबंदी लागू होती. यातील शिक्षण, संपत्ती, शस्त्र, रोटी, बेटी, तट व समुद उल्लंघन या सात बंदी यामुळे शूदवर्णाचे लोक अशिक्षित व दरिदी जीवन जगत होते. धर्मशास्त्राप्रमाणे शूद वर्णाच्या व्यक्तीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे डोळे काढावे, त्याची जीभ छाटावी व त्याच्या कानात शिसे ओतावे असा धर्म कायदा होता. सप्त बंदी कायद्याचा आधार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. संत तुकाराम महाराजांची गाथा बुडविली. छत्रपती शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांचे वेदोक्त प्रकरण गाजले आहे.
मराठा समाज हा हक्क अधिकारापासून वंचित होता. म्हणजेच तो शूद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याने ख-या अर्थाने नवीन युगाला सुरुवात झाली. त्याची प्रेरणा घेऊन ब्रिटीश राजवटीमध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी शूद समाजाला प्रबोधित करून आपल्या हक्कासाठी लढण्यास उद्युक्त केले. महात्मा जोतिबा फुले यांनी ब्रिटिशांकडे शूदवर्णाच्या अशिक्षित गोरगरीब समाजाला शिक्षण व विशेष सवलती देण्याची प्रथम मागणी केली. 'गुलामगिरी' या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद व अतिशूद समाजाची म्हणजेच शेती व शेतीवर उपजीविका करणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे. शूद वर्ण म्हणजेच मराठा व आजचा इतर मागासवर्ग. अतिशूद म्हणजे अस्पृश्य व आदिवासी समाज, ज्याला आज आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणतो. महात्मा फुले यांनी शूद अतिशूदांसाठी मोठा सामाजिक लढा उभा केला. हे कार्य पुढे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये चालू केले. त्यांनी मोफत शिक्षण, मुलांसाठी सर्व जातींचे वसतीगृह व बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या राज्यामध्ये ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी ब्राह्माण, शेणवी, कायस्थ, पारशी वगळता उर्वरित मराठा बहुजन समाज हा शूदवर्णाचा असून शेतीवर उपजीविका करणारा अडाणी वर्ग आहे म्हणून त्यांना आरक्षण घोषित केले.
छत्रपती शाहूमहाराजांच्या या कार्याचे प्रतिबिंब म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्यांनी अतिशूद वर्णाच्या लोकांना आरक्षणाची व्यवस्था केली. १५ टक्के अनुसूचित जाती, साडेसात टक्के अनुसूचित जमातीसाठी ३४१ व ३४२ कलम टाकले व इतर मागासवगीर्यांसाठी ३४० कलमानुसार आयोग नेमण्याची व्यवस्था केली. ३४० व्या कलामानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित कराण्यास व आरक्षणाचा लाभ देण्यास भारत सरकारने चाल-ढकल केल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला व इतर मागासवगीर्यांच्या हक्क अधिकारासाठी लढा दिला. भारतातील पहिला इतर मागासवगीर्यांसाठीचा आयोग म्हणजे १९५३ चा खा. काका कालेलकर आयोग. या आयोगाचे काम इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित करणे व त्यांच्या उन्नतीसाठी सूचना करणे हे होते. या आयोगापूवीर् ब्रिटीश राजवटीमध्ये आठ आयोग जाती निश्चिती करण्यासाठी झाले होते. त्यांनी काढलेले निष्कर्ष हा होता की १. शूद वर्णाचे लोक, २ ब्राम्हणेतर लोक. ३ शेती करणारे व शेतीवर उपजिविका करणारे म्हणजे इतर मागासवगीर्य लोक या आधारे व एकूण भारत देशाचा अभ्यास करून कालेलकरांनी २३९९ जाती निेश्चित केल्या. यामध्ये मराठा समाजाचा मराठा म्हणून समावेश केला आहे. परंतु हा अहवाल लागू करण्यात आला नाही. पुढे १९७७ मध्ये मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने ३७४३ जाती निेश्चत केल्या. १३४४ जाती वाढवल्या. पण शूदवर्णाच्या व शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला वगळले, याची त्यांनी कुठलीही कारणे दिली नाहीत. हा सरळ सरळ मराठा समाजावर अन्याय झाला आहे. मात्र देशभरामध्ये मराठा समाजासारखे जीवन जगणारे जाट, कुमीर्, अहिर, यादव, रेड्डी, गौडा, नायर व महंतो यांचा समावेश केला आहे.
महाराष्ट्रात माळी, धनगर, वंजारी, तेली हेही सामाविष्ट झाले आहेत. १९९० मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली. त्याला सवोर्च्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे १९९५ पर्यंत मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली नाही. इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार या याचिकेमध्ये मागणी केली नसताना सवोर्च्च न्यायालयाने एक अन्यायकारक निर्णय देऊन ५० टक्केची मर्यादा घातली. केंद सरकारने नेमलेल्या खासदार नचिपन कमिटीने मात्र ही मर्यादा घटनाबाह्य असून ती रद्द करावी अशी शिफारस केंद सरकारकडे केली आहे. केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकमध्ये ६९ टक्के, आंध्रात ६५ टक्के, राजस्थानात ६५ टक्के, महाराष्ट्रानेसुद्धा ५२ टक्के मर्यादा ओलांडली आहे. आता ५२ टक्के ओ. बी. सीं. ना ५२ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. जो महाराष्ट्रात फक्त १९ टक्के मिळत आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील नोकरीचा लाभ मिळत आहे. पण पदोन्नती, शिक्षण व राजकारणातला लाभ मिळत नाही. यावर मराठा व इतर मागासवगीर्य समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. मराठा समाज ही जात नसून हा एक समूह आहे. आजच्या मराठ्यांची जात ही कुणबी आहे, हे अनेक वेळा ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो. भारतीय सैन्यामध्ये मराठा बटालियन आहे. 'मराठा मेला तर राष्ट्रही मेले. 'मराठा विना राष्ट्र गाडा न चाले' असे म्हटले जाते. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा. मराठी बोलणारा तो मराठा म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बारा बलुतेदार मावळ्यांना मराठा संबोधले जात होते. यावरून स्पष्ट होते की मराठा ही जात नसून प्रदेशवाचक शब्द आहे. महात्मा फुले हे शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणजे कुणब्यांचा राजा असे म्हणतात. १८८१ च्या जनगणेमध्ये मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एकच आहे. नंतर बॉम्बे गॅझेटियरप्रमाणे मराठा व कुणब्यांमध्ये भेदाभेद नाही. मराठा कुणीबीचे विवाह न्यायालयाने वैध ठरवले. गॅझेटियर ऑफ इंडियानुसार मराठा-कुणबी यांच्यात फरक नाही. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी. मराठा कुणबी समाजाचे लग्नविधी, कुलदैवत, परंपरा, सण, उत्सव एकच आहेत. १ जून २००४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या त्नक्र ८३ व्या दुरुस्तीप्रमाणे मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना आरक्षणाचा लाभ मिळावा असे म्हटले आहे. वरील निर्णयावरून महाराष्ट्र सरकारला मराठा कुणबी एकच असल्याचे मान्य होते. कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र शूद वर्णाच्या शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला मात्र मिळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाजातील मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजावर हा अन्याय आहे. आज मराठा समाजातील ८० टक्के तरुण हे दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. कारण त्यांची आथिर्क परिस्थिती नसते व ग्रामीण शाळेमध्ये शिकल्यामुळे भाषेचा प्रश्ान् उद्भवतो. हा एक न्यूनगंड आहे. एकूण मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजीविका करत असतात. मुख्यत: निसर्गावर अवलंबून आहे. यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. जिराईत शेतीचे मालक आहेत. म्हणून दारिद्य रेषेखाली जीवन जगत असतात. आत्महत्या करणाऱ्या ३७०० पैकी ३२४६ हे मराठा कुणबी समाजातील आहेत. कर्जबाजारीपणाने व्यथित आहे. आथिर्क दुर्बलतेमुळे सामाजिक स्तरही खालावला आहे. मागासवगीर्यांची व्याख्या करताना ज्या समाजाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आथिर्क दुर्बल आहेत व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मागासवगीर्य समजावेत. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील ८० टक्के समाज अशिक्षित आहे व ७० टक्के दारिद्य रेषेखाली जीवन जगत आहे. म्हणून तो मागासवगीर्य आहे व आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र आहे. आज मराठा समाज रोजगार हमी योजना, माथाडी कामगार, हमाली करणे अशा निकृष्ट दर्जाचे काम करून उपजीविका करत आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही खूप मोठ्या आहेत. सहकार चळवळ हे महाराष्ट्राला मराठा समाजाचे योगदान आहे. परंतु सरकारी धोरणामुळे सहकार चळवळ मोडकळीस आली आहे. राज्यकतेर् मराठा असल्यामुळे आपण मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्यास आपण जातीवादी ठरू अशी भीती बाळगतात. आजपर्यंत मराठा समाजाने स्वत:साठी ही पहिलीच मागणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाल्याने गेली अनेक वषेर् धुमसत असलेला आरक्षण समर्थक व आरक्षण विरोधक हा वाद संपुष्टात येईल व सामाजिक ऐक्य घडेल. छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षणाचा लाभ दिला. आज शाहूंचा मराठा आरक्षणाची मागणी करतो तर त्याला आरक्षणाचे लाभधारक विरोध करतात. याचा खेद वाटतो. म्हणून धर्मवादी जातीव्यवस्था गाडण्यासाठी समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन राज्यर्कत्यांनी मनुवादाकडून मानवतावादाचा प्रवास पूर्ण करावा.

Wednesday 24 September 2008

दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते!-मटा दि. २५/०९/२००८

दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा 'ऐतिहासिक' निष्कर्ष क्रीडामंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काढला आहे. त्यामुळे दादोजींच्या नावे क्रीडा प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे नाव बदलण्यात येणार आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने एकमुखाने हा निष्कर्ष काढला असला तरी ख्यातनाम इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर आणि गजानन मेहेंदळे यांनी समितीच्या कामकाजातून अंग काढून घेतले, हे विशेष.
समितीच्या अहवालातील शिफारशी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना लवकरच सादर केल्या जातील. याबाबत पुढचा निर्णय मुख्यमंत्री घेतील,' असे क्रीडा व शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके 'मटा'शी बोलताना म्हणाले. शिफारशींचा तपशील देणे मात्र त्यांनी टाळले. दादोजी शिवरायांचे गुरू नसल्याने त्यांच्या नावे क्रीडा पुरस्कार दिल्यास कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी संभाजी ब्रिगेड, छावा या मराठा संघटनांनी दिली होती. त्यामुळे दादोजी शिवाजी महाराजांचे गुरू होते की नव्हते, याचा शोध घेण्यासाठी सरकारने पुरकेंच्या अध्यक्षतेखाली चौदा सदस्यीय समिती नेमली. बेडेकर व मेहेंदळे यांनी कामकाजात भाग घेतला नाही; तर डॉ. अ. रा. कुलकणीर् यांनी समितीला पत्र पाठवून 'दादोजी शिवरायांचे गुरू असल्याचा दाखला इतिहासात सापडत नाही,' असे सांगितले. समितीने यासंदर्भात विविध संघटना व व्यक्तींकडून मते मागवली असता, अडीच हजारांहून अधिक पत्रे आली. शिवकालीन कागदपत्रांमध्ये कुठेही दादोजींनी शिवाजी महाराजांना प्रशिक्षण दिल्याचा उल्लेख आढळत नाही. कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार असलेले दादोजी आदिलशाहचे सेवक होते, असा अभिप्राय सर्वच पत्रांमध्ये व्यक्त करण्यात आला.
तेव्हा जनमताचा हा कौल समितीने स्वीकारावा, अशी भूमिका डॉ. आ. ह. साळुंखे यांनी मांडली. अखेर दादोजी शिवरायांचे गुरू नव्हते, असा निष्कर्ष समितीने मंजूर केल्याची माहिती समिती सदस्य व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
क्रीडा प्रशिक्षक पुरस्काराला शहाजीराजांचे नाव? दादोजी कोंडदेव यांच्याऐवजी क्रीडा प्रशिक्षक पुरस्काराला शहाजीराजांचे नाव द्यावे, असा आग्रह अनेक समिती सदस्यांनी धरला आहे. त्याशिवाय लहुजी वस्ताद साळवे आणि शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार देण्याची सूचनाही काहींनी केली आहे.

Wednesday 17 September 2008

Who’s the real Hindu?- Karan Thapar ( Hindustan Times)

Does the VHP have the right to speak for you or I? Do they reflect our views? Do we endorse their behaviour? They call themselves the Vishwa Hindu Parishad, but who says they represent all of us? This Sunday morning, I want to draw a clear line of distinction between them and everyone else. My hunch is many of you will agree.

Let me start with the question of conversion — an issue that greatly exercises the VHP. I imagine there are hundreds of millions of Hindus who are peaceful, tolerant, devoted to their faith, but above all, happy to live alongside Muslims, Christians, Sikhs, Buddhists, Jains and Jews. If any one of us were to change our faith how does it affect the next man or woman? And even if that happens with inducements, it can only prove that the forsaken faith had a tenuous and shallow hold. So why do the VHP and its unruly storm troopers, the Bajrang Dal, froth at the mouth if you, I or our neighbours convert? What is it to do with them?

Let me put it bluntly, even crudely. If I want to sell my soul — and trade in my present gods for a new lot — why shouldn’t I? Even if the act diminishes me in your eyes, it’s my right to do so. So if thousands or even millions of Dalits, who have been despised and ostracised for generations, choose to become Christian, Buddhist or Muslim, either to escape the discrimination of their Hindu faith or because some other has lured them with food and cash, it’s their right.

Arguably you may believe you should ask them to reconsider, although I would call that interference, but you certainly have no duty or right to stop them. In fact, I doubt if you are morally correct in even seeking to place obstacles in their way. The so-called Freedom of Religion Acts, which aim to do just that, are, in fact, tantamount to obstruction of conversion laws and therefore, at the very least, questionable.

However, what’s even worse is how the VHP responds to this matter. Periodically they resort to violence including outright murder. What happened to Graham Staines in Orissa was not unique. Last week it happened again. Apart from the utter and contemptible criminality of such behaviour, is this how we Hindus wish to behave? Is this how we want our faith defended? Is this how we want to be seen? I have no doubt the answer is no. An unequivocal, unchanging and ever-lasting NO!

The only problem is it can’t be heard. And it needs to be. I therefore believe the time has come for the silent majority of Hindus — both those who ardently practice their faith as well as those who were born into it but may not be overtly religious or devout — to speak out. We cannot accept the desecration of churches, the burning to death of innocent caretakers of orphanages, the storming of Christian and Muslim hamlets even if these acts are allegedly done in defence of our faith. Indeed, they do not defend but shame Hinduism. That’s my central point.

I’m sorry but when I read that the VHP has ransacked and killed I’m not just embarrassed, I feel ashamed. Never of being hindu but of what some Hindus do in our shared faith’s name.
This is why its incumbent on Naveen Patnaik, Orissa’s Chief Minister, to take tough, unremitting action against the VHP and its junior wing, the Bajrang Dal. This is a test not just of his governance, but of his character. And I know and accept this could affect his political survival. But when it’s a struggle between your commitment to your principles and your political convenience is there room for choice? For ordinary politicians, possibly, but for the Naveen I know, very definitely not.

So let me end by saying: I’m waiting, Naveen. In fact, I want to say I’m not alone. There are hundreds of millions of Hindus, like you and me, waiting silently — but increasingly impatiently. Please act for all of us.
- karan Thapar

Tuesday 16 September 2008

दैनिक सकाळ, दि. १७/०९/२००८

मुंबई, ता. १६ - कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान व इतर राज्यांमधील राखीव जागांचा अभ्यास करून महाराष्ट्रातील मराठी समाजाला आरक्षण देण्याचा विचार केला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज मराठा समन्वय समितीच्या बैठकीत दिले.

मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करून आरक्षणाची टक्केवारी वाढवावी, अशी मागणी समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मुख्यमंत्री देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार, मराठा सेवा संघाचे पुरषोत्तम खेडेकर, भारतीय मराठा संघाचे किसनराव वरखिंडे, विजयसिंह महाडिक, छावा मराठा युवा संघटनेचे प्रा. देविदास वडजे, महाराष्ट्रीय मराठा महासंघाचे अंकुश पाटील, छावा संघटनेचे प्रा. चंद्रकांत भराट आदी उपस्थित होते. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर सुमारे दोन तास या बैठकीत चर्चा झाली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या बापट समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा, अशी मागणी विनायक मेटे व अन्य नेत्यांनी केली.

मुळात मराठा व कुणबी हा एकच समाज आहे, परंतु कुणबी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला आहे व मराठा समाजाला त्यापासून अलग करण्यात आले आहे. मराठा समाजाचाही ओबीसीमध्ये समावेश करून या प्रवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवावी, असा आग्रह बैठकीत धरण्यात आला. मुख्यमंत्री देशमुख यांनी त्यावर म्हणाले की, बापट समितीची मुदत संपलेली आहे. नवीन नियुक्ती होण्यास एक-दोन महिन्यांचा कालावधी लागेल. कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू व अन्य राज्यांमध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण कसे दिले गेले, याची माहिती मागविण्यात आली आहे. विधी व न्याय विभागामार्फत त्याचा अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यावर निश्‍चितपणे विचार केला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर ओबीसींच्या आरक्षणात अडचण येणार नाही, त्याचीही खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्‍नावर तूर्त कोणत्याही प्रकारची आंदोलने करण्यात येऊ नयेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले व समितीच्या नेत्यांनी ते मान्य केले. त्यानुसार उद्या औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन लवकरात लवकर करून काम सुरू करण्यात यावे व त्यासाठी सुरुवातीला किमान शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. त्यावर स्मारकाचे कामही लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

----------------------------------------------------------
राष्ट्रवादीची अनुकूल भूमिका मराठा समाजातील गरीबवर्गाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे, असे प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आज झालेल्या कार्यकर्ता शिबिरात माजीमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी दलित समाजातील श्रीमंतांनी आपण स्वतःहून राखीव जागा नाकाराव्यात व मराठा समाजातील गरीब घटकाला त्याचे फायदे मिळावेत याची खबरदारी घ्यावी. हीच खरी सामाजिक न्यायाची भूमिका आहे.
----------------------------------------------------------

मटा दि. १७/०९/२००८

कोणत्याही मागासवर्गांच्या आरक्षणाला धक्का न लावता राज्यातील मराठा समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय निवडणुकांपूर्वी घेतला जाईल, यासाठी न्या. बापट आयोगाच्या अहवालाचा अभ्यास करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंगळवारी केली. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा तसेच नोकऱ्यात २५ टक्के आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, शिवसंग्राम, संभाजी ब्रिगेड, छावा, जिजाऊ ब्रिगेड अशा संघटना समन्वय समितीच्या छत्राखाली एकवटल्या असून त्यांच्या नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची सह्यादी अतिथीगृहावर भेट घेतली.
मराठा समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीत समावेश करावा, अशी मराठा समन्वय समितीची प्रमुख मागणी असून त्याबाबत सरकारची भूमिका सहानुभूती व न्याय देण्याची आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने न्या. बापट आयोग नेमला असून त्यांचा अहवालही सरकारला मिळाला आहे. त्याचा अभ्यास चालू असून त्यानंतर विधी व न्याय खात्याचा अभिप्राय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. मराठा व कुणबी या दोन जाती नसून एकच आहेत हे समन्वय समितीचे म्हणणे मान्य करत, विदर्भ व कोकणात या दोन जातींमध्ये फारसा फरक नाही, असा निर्वाळाही मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला न्याय दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. शिवाय, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने शब्द दिला असल्याने मराठा समन्वय समितीतफेर् बुधवारी औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर काढण्यात येणारा मोर्चा त्यांनी रद्द केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या राज्यात मागासांसाठी ५२ टक्के आरक्षण असून त्यात मराठा जातीसाठी २५ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करतानाच राज्यस्थानमध्ये ६५ टक्के, तामिळनाडूत ६९ टक्के तर कर्नाटकात ७२ टक्के आरक्षण असल्याचा दाखला समन्वय समितीच्या नेत्यांनी या बैठकीत दिला. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. निवडणुकीपूवीर् आरक्षण दिले नाही तर आंदोलन केले जाईल, असे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले. बैठकीला मराठा महासंघाचे शशिकांत पवार, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे अनंत चोंदे व इतर संघटनांचे नेते उपस्थित होते. .......
विलासरावांचा उत्साह: मुख्यमंत्री विलासराव देशमुख हल्ली वार्ताहर आणि विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियाला टाळत असतात. पण मराठा समन्वय समितीबरोबर बैठक झाल्याबरोबर मराठा समाजाला निवडणुकीपूवीर् न्याय देऊ, ही घोषणा करण्याकरिता मुख्यमंत्री स्वत:हून कॅमेऱ्यांसमोर गेले, हे विशेष!

खेरलॅंजी मधील अमानवी कृत्य




दैनिक लोकमत, दि. १७/०९/२००८


Sunday 14 September 2008

सेज़ नको किसान सेज़ हवे- डॉ. कलाम


"कुठलीही सुपीक जमीन सेज़ प्रकल्पा साठी विकू नका" हा महत्वच सल्ला शेतकर्यांना दिला आहे भारतरत्न डॉ. कलाम यांनी." मला कुठलाही शेतकरी शेतिविना पाहायाच नाही. मला माहीत आहे शेतकर्यासाठी आणि त्याच्या कुटुंबा साठी शेतीचे काय महत्व आहे. हे उदगार डॉ. कलाम यांनी " वर्ल्ड फाउंडेशन ओन् रेवरेन्स फॉर ओल लाइफ" या पुणे येथील कान्फरेन्स मध्ये काढले. सेज़चे महत्व पटवून देताना कलाम यांनी सांगितले की कुठलीही जमीन सेज़साठी उपयोगात आणणार आसाल तर त्या शेत जमिनीच्या मालकाला आजच्या बाजार

किमती नुसार त्याचा हिस्सा ( शेर) दिला पाहिजे जेणे करून तो आणि त्याचे कुटुंब रस्त्यावर येणार नाही. आणि त्या शेतकर्याला एकदाच शेत जमिनीची पूर्ण रक्कम न देता ठराविक काळानुसार आर्थिक मदत मिळायला हवी. डॉ. कलाम यांनी यासाठी पुणे येथील मगर पट्टा ह्या प्रकल्पाचे उदाहरण दिले ज्यात १२० शेतकरी सभासद आहेत.
त्याच बरोबर डॉ. कलाम यांनी शेतकर्यांना कापसाचे उत्पादन घ्यायचे आसेल तर भटिंडा ( राज्य: पंजाब) येथील शेतकर्यांचे अनुकरण करायलासुचविले. भटिंडा येथील शेतकरी योग्य प्रतिचे बियाणे, योग्य खत आणि आवश्यक कीटक नाशके वापरुन भरघोस उत्पादन काढीत आहे, ह्याचेच आनुकरण केल्यास शेतकर्यांच्या आत्महत्याचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकते, ह्या गंभीर प्रश्ना ला डॉ. कलाम यांनी हात घातला.


जय जिजाउ जय शिवराय जय भीम


-शिवश्री

Thursday 11 September 2008

दि. ७/०९/२००८, दैनिक लोकमत मधील लेख


दि. १२/०९/२००८, दैनिक लोकमत


आधुनिक त्रिमूर्ती


माणसाचा मोठेपणा त्याच्या सावलीवरून ठरतो. ही सावली त्याच्या कार्य-स्मरणाची असते. भारतीय राजकारणात अनंत व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. परंतु त्या सर्वांत छत्रपती शिवराय , महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रभाव अजोड आहे. या तिघांच्या नेतृत्वात , कर्तृत्वात असं कोणतं वेगळेपण होतं ? हे तिघेही लोकनेते होते. तथापि , त्यांच्या नेतृत्वाला निश्चित विचारतत्त्वांची बैठक होती आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा आग्रही ध्यास होता. लोकनेतृत्व करायचं तर तत्त्वं गुंडाळून ठेवावी लागतात आणि तत्त्वांचा आग्रह धरायचा तर लोक मागे येत नाहीत , असा भारतीय समाजकारणाचा इतिहास आहे. परंतु हे तीन लोकनेते या इतिहासास अपवाद ठरले , म्हणून त्यांचे कार्य ऐतिहासिक झाले.

छत्रपतींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी राज्याची नव्हे , तर स्वराज्याची कल्पना मांडून प्रत्यक्षात आणली. महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ' चले जाव ' म्हणतानाच येणाऱ्या स्वातंत्र्यात लोकस्वातंत्र्याचा आग्रह धरला. डॉ. आंबेडकरांनी तर सामाजिक समतेच्या प्रतिष्ठापनेसाठी आयुष्याचाच होम केला. भारताच्या प्रजासत्ताक लोकशाहीचं सार या त्रिमूतीर्ंच्या स्वराज्य , स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांत आहे. या तीन तत्त्वांची गुंफण आणि त्यातून निर्माण झालेली भारतीय लोकशाही हेच या त्रिमूर्तींचं लोकोत्तर कार्य आहे ; परंतु हेच कार्य विसरून या राष्ट्रपुरुषांना वेगवेगळं करून पुजलं-भजलं जातंय. ते गैर आहे. आज या राष्ट्रपुरुषांना मानणाऱ्यात फार मोठं वैचारिक अंतर आहे. ते त्यांच्या कार्याचा घोर अपमान करणारे आहे. ' डॉ. आंबेडकरांचा विजय असो ' म्हणताना ' जय शिवाजी! जय गांधीजी ' असाही गजर व्हायलाच हवा. तसंच ' शिवाजीमहाराज की जय ' चा नारा लगावताना महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचाही जयजयकार करण्यास विसरू नये. या तिघांचं जीवनकार्य हे राष्ट्रउभारणीचं शास्त्र आहे. तथापि , त्याचा संस्कार करवून घेण्याऐवजी त्यांची नावं शस्त्रासारखी एकमेकांविरोधात वापरली जात आहेत. महात्माजी काँग्रेसवाल्यांचे , डॉ. आंबेडकर दलितांचे आणि शिवराय दोघांनाही विरोध करणाऱ्यांचे ; अशी या विभागणी झालीय. ती राजकीय स्वार्थासाठी आहे. त्यामुळे समाजात अहंकार बळावतोय , मूर्खपणा वाढतोय.

महात्माजी आणि आंबेडकर या दोघांनीही शिवरायांच्या समताधिष्ठित राज्यपद्धतीला आदर्श मानलं आहे. खेडे स्वयंपूर्ण व्हावे , ग्रामविकास व्हावा या गांधीविचारांची बीजे शिवशाहीत आहेत. शिवरायांच्या भूमीत कार्यर्कत्यांचं मोहोळ आहे म्हणून गांधीजी साबरमतीचा आश्रम बंद करून र्वध्याला आले. काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारताच ' शिवाजीमहाराज की जय! ' म्हणत भारतभर फिरले. महात्माजींना आंबेडकरांच्या कार्याबद्दलही आस्था होती. दोघांत वैचारिक मतभेद होते. कारण दोघांचे मार्ग भिन्न होते. परंतु उद्दिष्ट एकच- मानवतेचं रक्षण व मानवतावादाला बढावा देणे हेच असल्यामुळे उभयतांना परस्परांबद्दल आस्था होती. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्धधर्म स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. आंबेडकर म्हणाले , ' आज मी समाधानी आहे. गांधींना दिलेलं आश्वासन मी पूर्ण केलंय. ' डॉ. आंबेडकरांच्या नियोजित ग्रंथलेखनात महात्मा फुले यांच्या चरित्राप्रमाणे महात्मा गांधींच्याही चरित्राचा समावेश होता. ते जाहीरपणे म्हणाले होते , ' माझ्यापेक्षा गांधींना अधिक कोण ओळखतं ? म्हणून मीच त्यांचं चरित्र लिहिणार आहे. ' गांधीजींच्या जिवाचीही चिंता आंबेडकरांना होती. त्यांनी गांधींना अनेकदा सावधही केलं होतं. ते गांधींना म्हणालेही होते , ' एक वैश्य , बनिया ब्राह्माणांसकट सर्वांचे नेतृत्व करतो , ही गोष्ट चातुर्वणीर् ब्राह्माणांना माहीत नाही , असं समजू नका ; पण एक गोष्ट तेवढीच खरी की , जोवर तुम्ही ब्राह्माणांचे हितसंबंध जोपासता तोवर तुमच्या महात्मापणाला धोका नाही. ज्या दिवशी तुम्ही ब्राह्माणांच्या हिताला बाधा आणाल , तेव्हा तुमची काय गत होईल , ते मी सांगण्याची गरज नाही. ' हे शब्द नथुरामने खरे केले.

गांधींबद्दल आंबेडकरांच्या मनात असलेली ही आस्था त्यांच्या अनुयायांनीही आपल्याला रुजवायला पाहिजे होती. सत्तास्वार्थासाठी दलित नेत्यांकरवी दलित समाजाला वापरणारी काँग्रेस वाईट , म्हणून काँग्रेस ज्यांना आपल्या मोठेपणासाठी वापरते ते गांधीजीही वाईट , हा अविचार आंबेडकरांना मानणाऱ्यांनी झटकला पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल दुरावा असण्याचं कारणच नव्हतं. कारण सामाजिक समानतेच्या बाबतीत शिवाजी महाराज काळाच्या खूप पुढे होते. त्यांनी महार-मांग या शूर जातींतील वीरांना गडकरी , सैन्याधिकारी पदी नेमून त्यांचा सन्मान केला होता. शिवशाही स्थापताना त्यांनी जातीचा अधिकार मोडून काढला. गुणांना , कर्तबगारीला श्रेष्ठ मानलं. म्हणूनच वाई परगण्यात नागेवाडीची पाटीलकी नागनाक महाराला मिळाली. अष्टप्रधान मंडळात वेगवेगळ्या जातींच्या मंडळींची सारख्याच उंचीची बैठक पाहून देशमुखांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा महाराज कडाडले , ' शिवशाहीत सर्वच बैठका एकाच उंचीच्या असतील , एकच फक्त त्यापेक्षा उंच असेल. ते जनताजनार्दनाने दिलेलं राजसिंहासन. ' रयतेचा राजा असा शिवरायांचा लौकिक होता. जनतेच्या सुख-दु:खांची त्यांना जाण होती , तसंच आपल्या जबाबदारीचंही भान होतं. लोकनेते म्हणवून घेणाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी बरेच किल्ले जिंकले , नवे किल्ले बांधले. पण तिथे त्यांनी आपल्या नावाचा शिलालेख नाही बसवला. त्यांचा पुतळाही त्यांच्या निधनानंतर अडीचशे वर्षांनी आकारास आला. याउलट स. का. पाटलांसारख्यांनी आपल्या हयातीतच ब्राँझचा टोलेजंग पुतळा तयार करवून मुंबईत ठाकूरद्वारच्या उद्यानात बसवला. स. का. पाटील जाऊन पंचवीसेक वर्षंच झालीत , पण त्यांचं नाव विस्मरणात गेलेय. मात्र शिवरायांंचा पराक्रम प्रथम कळतो आणि त्यांचा भव्य पुतळा पाहूनही त्यांचा पराक्रम श्रेष्ठच राहतो. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या पराक्रमाची थोरवीही अशीच आहे.

ही माणसं दगडाच्या इतिहासासाठी नव्हती. ही दगडातून इतिहास निर्माण करणारी माणसं होती. ती वाटून घेण्यासाठी नाहीत. संपन्न भविष्याची वाट दाखवण्यासाठी आहेत. त्या तिघांपुढे एकाच वेळी नतमस्तक होणं , हीच खरी त्यांना आदरांजली आहे , त्यांच्या विचारतत्त्वाची आचारक्रांती आहे.

-कलेक्शन

शेतकरी मागतो आहे साथ, देईल का कोणी त्याला मदतीचा हात


एखादा समाज जर आरक्षण मागत आसेल तर त्या समाजाची आजची परिस्थिती काय आहे हे समजावून घेतले पाहिजे.
तसेच त्या समाजातील किती टक्केवारी शिक्षीत आहे, किती जन शिक्षण घेऊ शकतात हेही पहिले पाहिजे आणि त्यांची मिलकत किती आहे ते तपासून त्यानंतरच त्या समाजाच्या आरक्षणाला विरोध किंवा पाठिंबा देण्यात यावा.एक तर वरील दिलेल्या मुद्यांची कोणी चाचपाणी करत नाही आणि आज जो थोड्या प्रमाणात मराठा समाज हा पुणे-मुंबई इथे स्थाइक झाला आहे आणि १-२ टक्के मराठा समाजातील राजकारणी आहेत त्यावरून मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे असा गैर-समाज होतो.

मुळात बहुसंख्य मराठा समाज हा खेडो-पाडि स्थाइक आहे आणि आपण सर्वांना इतके तरी माहीत आसेल की खेड्या-पाड्याची आजची स्थिती आणि स्वातंत्र्य-पूर्व काळातील परिस्थिती यात कितीसा फरक झालेला आहे. जाणकारणी हेही तपासून पहावे की स्वातंत्र्य प्राप्तीचा शेतकर्यांना किती उपयोग झाला आहे. इतकेच की एक लुटारे गेले आणि दुसरे आले. आज भारतातील खेड्यामध्ये आहे का कमीत कमी अर्धा दिवस वीज, आहेत का पक्या सडका? पिण्याच्या पाण्याची सोय? आरोग्या सुविधा?शालेय शिक्षणाची सोय आणि तेही दर्जेदार, मग काय विकास साधला आज पर्यंत? का विनाकारण भारत हा महाशक्तिशाली होणार याची भाषणे ठोकायची?

आज भारतातील शेतकरी आणि विकसनशील अथवा विकसित देशातील शेतकरी उदा. जपान, चीन, इत्यादी यांची तुलना केली तर इतके लक्षात येईल की जपान, चीन येथील शेतकरी हा एक प्रतिष्ठेचे जीवन जगात आहे आणि भारतातील शेतकर्याला मात्र दोन वेळेस चे जेवण महाग आहे मग कुठले आले शिक्षण. शिक्षण नाही मग आधुनिक शेती करण्याचा प्रश्नच येत नाही आणि पारंपरिक शेती करून दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. त्यातच पा उस, मिळणारी वीज याचा
लपंडाव, पोटापाण्यासाठी , मुलीच्या लग्नासाठी थोडीफार आसलेली जमीन, घर विकून हवालदिल होऊन बसतो शेतकरी. शेवटी आत्महत्या हाच
पर्याय उरतो शेतकार्यपुडे. असेच हाल राहीले शेतकर्याचे तर एकदिवस शेतकरी नवालसुद्धा उरणार नाही. आज जसे डायानासोर या प्राण्याला फक्त नावाने ओळखले जाते तसाच काळ शेतकर्यासाठी येउ नये म्हणजे झाले.

शेतकरी हा भारताच्या पाठी चा काणा म्हणून ओळखला जातो पण तोच कणा मात्र आज खिळखिळा झालेला आहे आणि काही प्रमाणात गाळुन सुद्धा पडत आहे. जर पूर्णपणे गाळुन पडला तर एक दिवस शेतीवरील ताबा हा काही मूटभर लोकांच्या हाती जाइल, बाकीचे आपण समजण्यास समर्थ आहात. जाता जाता इतके सांगतो की शेतकरी मागतो आहे साथ, देईल का कोणी त्याला मदतीचा हात.

जय जिजाउ जय शिवराय जय भीम

-शिवश्री

Wednesday 10 September 2008

दोन कोटी रुपये बालगंधर्वा स्मारकला मंजूर

केतकरानि जी करणे दिली आहेत शिव- स्मारकला विरोध करण्यासाठी ती करणे गंधर्व स्मारकला लागू होत नाहीत का?का गंधर्वा स्मारकाचा विषय निघताच शेतकर्याचे प्रश्न सुटतात? राज्या शासनाने दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत गंधर्व स्मारकला?आमचा विरोध नाही गंधर्व स्मारकला, जर ह्या स्माराकातून खरोखेरीज काही प्रेरणा मिळत आसेल तर होऊ द्या स्मारक, इथे कुणाचाच विरोध करण्याचे कारण नाही.आज पर्यंत कुठे होते केतकर शेतकरी आत्महत्या करताना? काही विधायक केले आहे का केतकरानि? शेतकरी आत्महत्या करतात हा गंभीरच प्रश्न आहे पण त्याला शिव-स्मारकला विरोध करणे हा उपाय नव्हे? आणि असाच विरोध करायचा आसेल तर जे दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत गंधर्व स्मारकला ते शेतकर्यांसाठी वापरण्यात यावे.

जय जिजाउ जय शिवराय जय भीम

-शिवश्री

Tuesday 9 September 2008

Worshipping the False Gods...Tilak!!!

This is not about Dr.Ambedkar or Arun Shouri.Mr.Shouri has already been answered by many(Lucky to not have a fatwa issued against him).Shouri criticized Dr.Ambedkar for not contributing in the freedom struggle.I wonder why didnt he criticize Gandhi for not contributing in Scientific Reserch? But this is not even about Gandhi. This is about another false god called Bal Gangadhar Tilak....an aspect of Tilak about which no one dares to speak about.Shouri criticized Ambedkar for not co-operating with Mahatma. I am going to speak about Tilak’s relation with another (true) Mahatma of this country..Mahatma Phule and Shahu Maharaj.To expose people like Tilak is always going to be a lengthy task.So readers are requested to have some patience.

This begins with the days when no one knew who were Tilak and Agarkar.Tilak and Agarkar had written in favor of the descendents of Shivaji Maharaj.They tried to expose the ill treatment of the descendants. This angered the Brahmin community and a Brahmin by the name Barve took them to the court .This happened in 1882.Tilak and Agarkar were jailed for that at dongri(Bombay).The bail amount was not small. It was Rs 10,000/- in 1882.Mahatma Phule came to his rescue then.Mahatma Phule ordered the treasurer of Satya Shodha Samaj, Ramsheth BapuSheth Uravne to gather the necessary amount.When Tilak and Agarkar were jailed for the first time in their life no Joshi, Kulkarni, Deshpande,Paranjpe came forward to help. This is what Tilak observed latter in his "Kesri". Tilak and Agakrar lost the case and had to suffer imprisonment for 3 months. When they came out Phule ordered his another associate and right hand man Narayan Medhaji Lokhande to take out a huge procession of these two.First public recognition of Tilak and Agarkar was given by Mahatma Jyotirao Phule.Both of them were given letter of honor which said "You have taken lot of trouble for Shivaji Maharaj which is why we people are behind you.

Our instincts say you will be a great leader tomorrow. We have just one request, instead of leading only the Brahmins lead everyone and you will become the leader of India."Now what did these two leaders reward Mahatma Phule with? When Mahatma Phule expired Tilak didn’t even bother to mention that in his Kesri!!! And Agarkar...the social reformer? Even he didnt feel it necessary to mention the death news of the only social reformer to be called as Mahatma in his "Sudharak"!!!That very Tilak who wrote an editorial when Ramsheth Bapusheth Uravne a follower of Mahatma Phule expired; changed so much that he completely avoided mentioning the death news of Mahatma.(Arun Shouri are you reading this treatment to Mahatma???)

Why did he change so much ?Simple reason is that previously he was young and not established. He needed the support of the dalits to become a leader. But once established ... he became a true Brahmin. He kicked the dalits out of his "Kesri" and his life. He simply used Mahatma Phule's popularity to become popular himself and latter forgot the very roots on which he build his own popularity.(Pick the "kesri" after 28 Nov 1890 to cross check.)

This is one famous episode in the life of Shahu Maharaj...a descendent of Shivaji Maharaj .But allow me to say it again. In 1901 Shahu Maharaj was taking bath in Panchaganga River. Being a religious King it was customary for a brahmin to pray while the king is bathing in a river in Shravan month. He called for the official Brahmin Narayan Rajopdhyay. Now this Rajopadhyay was with his "keep" and had not taken his morning bath when called for. According to Hindu customs Bramhin cannot utter The Vedic Mantras without having bath. The driver raised this point.(Actually the entire episode is covered in the memoirs of the driver published in marathi.) Rajopadhyay replied that he was a brahmin and Shahu Maharaj a Kunbi(shudra). Shudras dont have rights to Vedic mantras. He will be praying by Puranic methods(considered as inferior method) and for Puranic mantras there is no need for the brahmin to have taken bath. Accordingly Rajopadhyay prayed with puranic mantras. But at the time of the bath another brahmin friend and employee of Shahu Maharaj, Rajaram Shastri Bhagwat was present. He objected to Rajopadhyay. He told to Shahu Maharaj that Rajopadhyay was insulting him by saying inferior mantras. Shahu Maharaj demanded explanation from Rajopadhyay. Rajopadhyay shamelessly admitted that he was uttering puranic mantras and that he won’t be using the Vedic Mantras. Hurt, Shahu Maharaj gave Rajopadhyay 3 months notice. He said think again, if at the end of 3 months if Rajopadhyay didnt agree to pray with vedic mantras for his employer he would be dismissed.

What followed is a classical example of Brahminic arrogance. Despite saying it was 3 month notice in reality Shahu Maharaj gave him 9 months. But look at Rajopadhyays arrogance. He didnt bother to reply. So finally Shahu Maharaj gave him a written notice. First one on 7th Nov 1901 and then the second notice on 8th Nov 1901 and finally the third notice on 1st May 1902.

The last notice was in a stern language and finally Rajopadhyay responded with written explanation on 5th May 1902.The explanation he gave was that he would not be worshipping the king with Vedic mantras because Shahu Maharaj was not a Kshatriya and so he didnt have any rights to Vedic Mantras. So Shahu Maharaj on 6th May 1902 dismissed Rajopadhyay. There was a severe outburst from the entire Brahmin community.

So severe was the brahminic reaction that they actually exploded a bomb in the wedding of Shahu Maharaj's daughter. Despite being a king Shahu Maharaj was given death threats.Now who was fuelling this anti Shahu Maharaj feeling? It was none other than Mr.Bal Gangadhar Tilak. And he did not start his work after Shahu Maharaj dismissed Rajopadhyay. Rajopadhyay's episode was known to Tilak and to support the fellow brahmin, even before Shahu Maharaj gave his first notice.Tilak in his "Kesri" dated 26th Oct 1902 and 30th Oct 1902(kesri was bi-weekly at that time) wrote in his editorial's a column titled "Vedokta ani Marathe Karma"(vedic and maratha deeds).And read carefully what Tilak has to say...Because of learning english language, today’s Maratha's have gone INSANE. They have gone insane and thats why they are demanding rights to Vedic Mantras." Not only does Tilak call Shahu Maharaj as mad, he is saying the entire Maratha's as mad. That Shahu Maharaj is from the family of Shivaji Maharaj is of no concern. Who authorized Tilak to call the entire Maratha community as insane?

Further more Tilak says"...In todays world Vedic Mantras are meant only for the Brahmins..No one else."About Shivaji Maharaj, Tilak writes "...Chatrapati Shivaji worked hard for Go-Brahmin, Hinduism and Gods. So as a return favor we brahmins had granted him the honour of being a Kshatriya..."Tilak does a favour on Shivaji Maharaj !!! "..current Marathas are worthless for such kind of favours. So no Maratha's can get the rights to vedic mantra's".

This happened before Shahu Maharaj dismissed Rajopadhyay. It seems that Tilak was dead against the britishers. But when it came to his own caste how does he choose to act? Tilak immediately sent a telegram to British Governer of Bombay requesting him that whatever Shahu Maharaj says dont listen to him. Do not consider him as Kshatriya.That very Tilak was down on his knees before the british government to maintain the interest of his caste.Isnt it clear what was important for Tilak...caste or country?(Shouri....Ambedkar traitor coz he took the help of Britishers..eh?How about applying the same logic to Tilak..?)Well what did Tilak do after that? A huge whispering campaign against Shahu Maharaj. He urged Rajopadhyay to fight against Shahu Maharaj and Rajopadhyay appealed first to British representative of Kolhapur Colonel Ferris on 10 sept 1902 which was rejected on 19 Feb 1903.On 23rd May 1903 on Tilak's urging Rajopadhyay appealed again to the next higher authority, Bombay governer. This was also rejected on 10 Oct 1903.Tilak again urged Rajopadhyay to appeal to the final authority, the govt of India which he did on 5th Jan 1905 and again a supplementary application on 10th April 1905.9th May 1905 the final verdict came from the governor general Lord Curzon and here too Shahu Maharaj was the winner.After that Tilak writes in his "Kesri " let us solve this issue by the way of talks.” As long as the option of court was open, the Maratha's were insane, but when all the options closed down, Tilak wanted to talk to insane Shahu Maharaj. Now he writes "Shahu became the hier to the throne. He has been done the Rajyabhishek.

So we Brahmins are ready to recognize him alone as Kshatriya".Tilak who till 1902 thought the Marathas as worthless for having Vedic Mantra, after the court verdict started saying Shahu Maharajs demands were not invalid as he had his Rajya Abhishek done in 1905. Didnt he knew that in 1902?Anyways continuing...Shahu Maharaj wanted to accept this Tilaks propsal.

But he had an intelligent non-brahmin aid Bhaskar Jadhav of satya shodhak samaj. He raised a query...what about Bapusaheb Maharaj, the brother of Shahu Maharaj? Tilak again replied in his kesri, "We can not accept Bapusaheb Maharaj as kshatriya. He will remain as a shudra only." Bhaskar Jadhav was not satisfied and he asked again...according to Mr Tilak , You brahmins are willing to recognise only Shahu Maharaj as kshatriya because he sits on the throne. Applying the same logic if tomorrow if some muslim sits on the throne will you grant him the same privilege? Tilak's reply is a clear indication for whom was his entire struggle. He replied “if tomorrow such issue arise and a muslim ascends the throne, the question of vedic mantras will arise. And the reply to such issue will be given by the brahmins of those times. Tilak does not use the word people, he uses the term brahmins. Understand the difference. It shows clearly who according to Tilak the bosses were.There are many more things about Tilak that can be said, about the threat to burn down the pandals of the congress in pune if they addressed to the problems of the untouchables in 1905.But those will be unnecessary. Tilak has shown in many ways that he was a firm believer of Hinduism and the supremacy of the brahmins over the common people. Hinduism say it clearly that the shudras are only slaves of the remaining castes. He never ever bothered for their freedom from the caste shackles.

So will it be to outrageous to assume that while he said "Swaraj is My Birth Right", his definition of Swaraj means Brahmin Raj? Did he fight for the rule of the people or for the rule of the Brahmins? Is he Lok-Manya or is he Brahmin-Manya?Mr Shouri isnt this one of the false gods that the people are worshipping at large? We are waiting for your Worshipping the false Gods Part 2.But I am sure that will never come…After all Tilak is also a Brahmin na!!!

-शिवश्री अंकुर देवकर

Sanskrit has nothing to do with Computer

Some people, whose forefathers themselves were the sufferers of this language, try to take pride and seek solace in believing that Sanskrit is a good language for computer. The inventor of this myth seems to be a person, not only with perverted sense of egotism about his heritage and ignorance of his ancestral history, but also an urge to befool the gullible masses of India. The minimum expectation from such scholars would be to pause and think how a language which was not allowed to be learned by a scholar like Dr. Ambedkar can ever be considered a good language worth learning by masses. It is language of control by a few over multitude. It is a language of oppression.

It has nothing to do with computer language, which is a binary language, a language of 1s and 0s, a language of ON and OFF. After all a computer is nothing but a collection of millions of fast acting switches. It is by creating computer codes like EBCDIC and ASCII, various alphabets can be assigned numbers, and these numbers representing alphabets are converted into binary for computer processing. Any language on the earth is equally good or equally bad for the computer purpose. Those who claim that Sanskrit is a useful language for computer have got a cruel and malevolent intention of projecting the misdeeds of their forefathers. A scholar in them is dead, only a caste superiority prejudice is seen in their such statements.

Most unfortunate thing is that so called scholars from among the sufferers of tyranny of this language, seem to have a liking of this language through misconceived ideas about it. Their multiple degrees are worth throwing away in a dust bin. Just by becoming learned in Sanskrit does not qualify anybody to receive respect, you have to be born. Read Dasbodh of Ramdas, if you have doubts. The language which ruined this country, is respected by these so called scholars. It was Ramdas himself, a Brahmanical social activist, who coined a phrase for such people in Marathi- "padhat murkh", the nearest English rendering of it should a learned fool.
What did the propagators of this language give to the people of this country apart from disintegration and slavery of centuries. What kind of society they have produced? A society full of discriminations where more than half of people are unfit even for a touch, another one third driven to forests and another group whose occupation is crime, a society where prostitution is practiced in the name of God and religion, a society where suicide is sacrosanct, a society where uttering obscene abuses is a part of religion, a society where daughters are murdered immediately after birth, a society where widows are burnt on the funeral pyre of their husbands, a society where a vast section of people are deprived from holding any property, holding any arms, getting any education, a society where taking a marriage procession on a public road brings atrocities, murder, rape and arson, a society where nearly the whole country uses the public roads as a toilet. And one expects these very people the sufferers of this extreme exploitation to regard this language as holy and sacrosanct. One only has to remember the words of Theludesus: It may be your interest to be our masters, how can it be ours to be your slaves. Still this is probably the only country in the world where the slaves are enjoying their slavery and prisoners guard the prison gates and display their fetters as ornaments.

There are people who try to propagate that the Sanskrit language is the original language which was gifted by God (to Brahmins of India). Despite all other languages in the world, to consider one particular language as "god given" is the worst form of imprudence and arrogance, to say the least; and is not only derogatory to the inventor of the idea, but also marks the god with partiality to a caste.

कलेक्शन

Brahmanism flourished due to British rule

Nair explains how the British helped spread of Brahmanism throughout India, and exclaims that the Brahmin succeeded in utilising the Britishers as an unconscious tool for the strengthening of his social control over masses by four streams of activity by the British administration which directly contributed to the strength of all-India Hinduism under Brahmin leadership. Dr. M. N. Srinivas classified them as follows.
(a)systematic reconstruction of Indian history
(b)development of mass communication media, films of mythological themes and Brahmanical control over press. To this could now be added electronic media and mythological serials.
(c)growth of movements against defects in Brahmanical religion like untouchability, child marriage etc.
(d)study of Sanskrit literature and philosophy

Nair exclaims that, thus the Brahmin discovered his soul and saw with clear eyes the beauty and ugliness of his own handiwork in India, and the regrouping of social forces that took place under the British regime. [Nair B. N., "The Dynamic Brahmin", p. 80]

कलेक्शन

Social Control through language

The so called "purity" of Sanskrit makes it a dead language, may be true, but that was the intention of the users, to safeguard their own supremacy over the masses. Nair exclaims:
"... The maintenance of the purity of Sanskrit language since the days of Panini until the present day is wonder of wonders that is largely to be explained by the tenacity of the Brahmin to preserve it as such, as the sacred language of status group even though their spoken language was, by and large, the local languages or a mixture of the two. This is not to admit that early Sanskrit before it reification did not borrow words from Dravidian languages and made them its own. As a matter of fact detailed research in the linguistic prehistory India is bound to reveal many instances for such a fusion of Tamil words into Sanskrit, especially that style of Sanskrit which came to be used for limited secular purposes." [Nair B. N., "The Dynamic Brahmin", p.68]

Was Sanskrit a spoken language?

Contrary to the recent hindutwavadi propaganda, it is a well established fact that Sanskrit was never a spoken language:
"Let us remember that Sanskrit as its meaning indicates was never a spoken language and that it was only a purified version of the language that was in popular usage such as Prakrit, and that its refinement and the codification of grammar in an unalterable form was the work of grammarians like Panini." [Nair B. N., "The Dynamic Brahmin", p.67]
Even strong protagonists like Pandit Mishra aver that it was a spoken language but the "spoken" means, it was spoken by "shishtas" i.e. elite (meaning Brahmins) alone. Rest of the masses were speaking Prakrit. [Mishra, p.376] Even in late Sanskrit drammas, as is well known, the charectors of higher castes speak Sanskrit, and the others speak Prakrit. So speech depended on the caste.

कलेक्शन