Sunday 2 November 2008

विश्वशांती किती खरी किती खोटी?

कोल्हापूर शहराचे नाव आठवतच राजश्री शाहू महाराजांची आठवण होते. ह्याच कोल्हापूर शहरात विश्वशांती यज्ञ आयोजित केला आहे. यज्ञ समितीच्या मते या यज्ञमुळे समाजात शांतता प्रस्थापित होईल, पुर्वी पासून यज्ञ होत आले आहेत आणि कोल्हापुरातच तीनशे वर्षा पुर्वी चाण्डी महायज्ञ झाल्याचा दाखलही यज्ञ समितीचे प्रमुख राम कुंडलाजी महाराज यांनी दिला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की या महायज्ञतून अंध श्रद्धा पसरवण्याचे काम होत आहे हे सिद्ध करावे मग मी सण्यासी व्रतचा त्याग करेन. जर ह्या यज्ञ तून खरोखरीच विश्वशांती प्रस्थापित होणार आसेल तर जे ह्या यज्ञला विरोध करतात त्या संघटनाना विश्व शांती नको आहे. यज्ञ समितीच्या मते यज्ञमुळे कोल्हापुरला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळणार आहे. कोल्हापुरला राजश्री शाहू महाराजांमुळे प्रेरणा क्षेत्राचा दर्जा हा मिळाला आहे आणि तोच प्रेरणा क्षेत्राचा दर्जा राहू द्यावा. कोल्हापुरात पर्यटक गेल्यास अगोदर तो राजश्री शाहू महाराजांच्या राजवाड्यात गेल्या शिवाय राहत नाही. शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचीच प्रेरणा घेण्याची खरी गरज आहे.
आता ज्या साठी यज्ञ समितीने विश्वशांती यज्ञ आयोजित केला आहे त्याचे कारण विश्व शांती प्रस्थापित करणे हे दिले आहे. आज भारतिया समोर दहशत वाद, शेतकर्यांची आत्म् हत्या, बेरोजगारी, अन्न- धण्या चा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, बहुजन समाजाला शिक्षणाचा प्रश्न , असे बरेच प्रश्न त्यांच्या समोर आहेत. जर ह्यातील एक जरी प्रश्न महा यज्ञ ळे सुटणार आसेल तर तर जरूर हा यज्ञ हो द्यावा आणि ज्या संघटना विरोध करत आहेत त्यांनी पण यज्ञ व्यवस्थित होण्या साठी मदत करावी. कीबहुना ह्या साठी आर्थिक मदत पण करावी. आता महत्वाचे असे की ह्या यज्ञ मुळे खरच विश्वशांती प्रस्थापित होणार आहे का? आजचे युग हे विज्ञानचे युग आहे. मग हा यज्ञ विज्ञानाला आनुसरून आहे का? आणि विज्ञानाच्या कुठल्या थेरि मध्ये मोडत आहे? तर ह्याला एकाच उत्तर की हा यज्ञ आयोजित केलाआहे तो विज्ञानाच्या कुठल्याही चौकटीत बसत नाही. म्हणजे हा यज्ञ फ़क्त सामन्या जनतेची, त्या मध्ये बहुजन समाजाची दिशाभूल करण्या साठी आयोजित केला आहे हा निष्कर्ष निघतो. ह्या यज्ञ मध्ये लाखो रुपयाचे तूप आणि ईतर साहित्य भस्मसात होणार आहे. आजची वाढती महागायि आणि त्यात असा यज्ञ आयोजित करणे म्हणजे जे भुकेलेले, ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही त्या लोकांची टिंगल करण्या सारखे होय. आज जनतेला अशा यज्ञ ची गरज नसून आज पर्यंत जे जे थोर नेते हो उंन गेले त्या सर्व महा मानवाच्या प्रेरणाची गरज आहे. शाहू - फुले - आंबेडकर यांनी कधी अश्या यज्ञ ची मदत घेतलेली आठवते का? उलट शिवाजी महाराजा विरुद्ध मुघल सरदार जिंकवा म्हणून पुण्यातील काही ब्राह्मणानि कोटी चाण्डी यज्ञ आयोजित केला होता तरीही शिवाजी महाराजांना अपयश आले का? मुळीच नाही . शिवाजी महाराजा सारखा राजा आपल्या मातीत होउन गेला या सारखे दुसरे भाग्य तरी आहे का? त्यांच्या प्रत्येक कार्यात जी प्रेरणाची उर्जा आहे त्याची खरी गरज आहे.
कधी महाराज लढाई सोडून कर्म कांड करीत होते का? त्यांची श्राध्ा जरूर होती पण ती अशी अंध श्रद्धा कधीच नव्हती. आणि आज यज्ञ आयोजित करून ह्याच अंध श्रद्धेला खात पाणी घातले जात आहे हे निदर्शन होते. यज्ञ समितीचे प्रमुख राम कुंडलाजी महाराज यांनी यज्ञ ला विरोध करणार्‍यांशी चर्चा करण्याची तयारी दाखविली आहे. तर चर्चा जरूर होयला पाहिजे. कारण कुठलाही राडा न होता चर्चेने प्रश्न सोडवणे आणि सार्वजनिक माल मत्तेचे नुकसान ना होऊ देणे हेच सामन्या माणसाला जे यज्ञला विरोध करतात आणि जे यज्ञला पाठिंबा देतात त्याच्या कडून आपेक्षित आहे.

शिवश्री उस्मानाबाद

No comments: